कुषीधन

कुषीधन Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from कुषीधन, Septic Tank Service, At post :/kolhewadi, Tal:/sangamner, Dis;-Anagar, Sangamnor.

25/05/2016

दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन
प्रा. डॉ. वि.सु. बावसकर
जगातील सर्वाधिक पशुधन असलेल्या देशामध्ये जरी भारताचा समावेश होत असला तरी सुद्धा जागतिक दुग्ध व्यवसायातील भारताचा हिस्सा केवळ ०.०१ टक्के आणि त्यापैकी महाराष्ट्राचा हिस्सा फक्त ८ टक्के आहे. आजच्या परिस्थितीचा विचार करता दुग्धोत्पादन व्यवसायास उज्ज्वल भविष्य आहे हे निर्विवाद. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने एक - दोन संकरित जनावरांपासून व्यवसाय करण्यास हरकत नाही. असे असतानाही शेतकरी या व्यवसायाकडे वळलेले दिसून येत नाहीत किंवा जे व्यवसाय करत आहेत ते पारंपारिक पद्धतीने करतात किंवा त्यांना व्यवस्थापन जमलेले दिसून येत नाही. दुग्ध व्यवसाय नफ्यात चालण्यासाठी दुधाळ गाईची निवड, पशुपोषण, सभोवतालची परिस्थिती या सर्व गोष्टींवर लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे पुढील काळात उत्तम व्यवस्थापनाने खर्च कमी करून दुग्ध व्यवसाय करणे आवश्यक आहे. किफायतशीर दुध उत्पादनाकरिता खालील बाबींकडे आवर्जून लक्ष देणे गरजेचे आहे.

* दुधाळ गाईची निवड :

* कमी दूध देणाऱ्या, भाकड गाईऐवजी अधिक दूध उत्पादन देणाऱ्या संकरित गाईची निवड करावी.

* जास्त विदेशी रक्त प्रमाण असणाऱ्या गाईंना व्यवस्थापन अतिशय चांगले लागते. अन्यथा त्या विविध रोगांना लवकर बळी पडतात. तेव्हा दुग्धोत्पादनाच्या दृष्टीने जास्तीत जास्त ६२.५ टक्के विदेशी रक्त प्रमाण असलेल्या गाईंची निवड करावी.

* दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेतातील गाय निवडावी व दूध उत्पादनाची प्रत्यक्ष पिळूनच खात्री करावी.

* बाजारात गाई खरेदी करताना दलालामार्फत फसलो जाणार नाही याची दक्षता घ्यावी. बाजारामध्ये येणाऱ्या जनावरांची कोणी खात्री देऊ शकत नाही.

* त्याचबरोबर अनेक ठिकाणावरून गाई विक्रीसाठी आलेल्या असतात, त्यामुळे संसर्गजन्य रोग किंवा इतर आजार व दोष असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

* दुधाळ गाईची पाश्र्वभाग मोठा व रुंद असतो.

* गाय ही आकर्षक, तरतरीत, मऊ अंगकातीची निरोगी असावी. गाईची त्वचा ही स्थितीस्थापक असावी.

* कास हाताला मऊ लागणारी, लांब, रुंद आणि ती मागे वरपर्यंत गेलेली असावी, लोंबकळणारी नसावी. तसेच चारही सड सारख्या आकराचे व समान अंतरावर असणे आवश्यक आहे.

* गाईचे डोळे, नाकपुड्या, जबडा, कपाळ, खांद्याची हाडे, पुठ्ठ्याचा भाग, माकड हाडाचा जोड, शेपटीचे मूळ, छातीचा घेर, पाय, खुर इ. अवयव योग्य प्रमाणबद्ध व सदोष आहेत की नाहीत याची खात्री करून मगच खरेदी करावी.

* गोठा व्यवस्थापन : दुभत्या गाईंना आरोग्यदायक थंडी, ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण करणारा गोठा हवा असतो. दुभत्या संकरीत जनावरांना अधिक आजारांची उत्पत्ती ही अस्वच्छ गोठयामुळे होत असते हे लक्षात घ्यावे. साधारणत: पाच गाईंसाठी २० फूट लांब व ८ फूट रुंद अशी १६० चौ. फूट जागा लागते. गोठा बांधताना तो पूर्व - पश्चिम दिशेस लांब असा बांधावा. ऊन, वारा, पावसापासून संरक्षण होण्यासाठी समोरच्या बाजूच्या भिंतीची उंची ६ फूट तर पाठीमागील बाजूच्या भिंतीची उंची ६ ठ ७ फूट ठेवावी. पैशाच्या उपलब्धतेप्रमाणे दगड किंवा विटाची भिंत बांधून घ्यावी. त्यावर सिमेंटचे अथवा चुन्याचे प्लॅस्टर करावे. त्यामुळे गोचिडांना राहण्यासाठी अथवा अंडी घालण्यासाठी जागा मिळत नाही. समोरील भिंतीलगत २ फूट रुंद, २ फूट उंच आणि आतून दीड फूट खोल गव्हाण बांधून घ्यावी. दर चार फुटावर लोखंडी अँगल्समध्ये एक कडी गाय बांधण्यासाठी बसवून घ्यावी. गोठ्याची उंची सर्वसाधारणपणे १० ते १२ फूट ठेवावी. गोठ्याच्या समोरील व पाठीमागील भिंतीच्या वरील मोकळ्या भागाला चेनलिंक जाळी बसवून घ्यावी. जमिनी मुरूमरहीत किंवा शक्य असल्यास कोबा, फरशी, घडवलेल्या दगडाची करता येते. गव्हाणीपासून जमिनीला साधारण १ फुटास १/२ इंचाचा उतार द्यावा. शेवटी गटार असावी. गोठ्यातील जनावरांना ताज्या व स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी. शेणखताचे खड्डे किंवा उकिरडा गोठ्यापासून दूर अंतरावर असावा.

* आहार व्यवस्थापन : दुग्धव्यवसायामध्ये जास्तीत जास्त (६० - ९०%) खर्च हा आहारावर होत असतो. त्यामुळे आपल्या दुभत्या गाईची निगा ठेवणे, तिच्या आहाराकडे लक्ष पुरविणे, आहाराचा पूर्णपणे उपयोग करून त्यापासून जास्त उत्पादन कसे मिळेल याकडे लक्ष देणे गरजेचे असते. खाल्लेल्या अन्नाचे दुधात रूपांतर करण्याची क्षमता ही संकरित गाईत जास्त असते. त्यामुळे योग्य व संतुलित आहार वापरून पूर्णपणे उपयोग करून घेणे हे दुग्घ व्यवसायाचे मूलभुत तत्त्व आहे. सकस व संतुलित आहार गाईंना दिल्यास दूध उत्पादनात सातत्य राहते

ऍग्रो स्पेशल
ShareFavoriteBack
शेळीपालन; नव्हे फक्त बोकडपालन!
4 मे 2016 - 06:15 AM IST
केवळ बोकडपालनाचा मोराडे यांचा अनोखा प्रयोग
बंदिस्त, अर्धबंदिस्त किंवा मुक्त अशा विविध स्तरांवर शेळीपालन हा व्यवसाय आता वाढत आहे. मात्र अर्धबंदिस्त प्रकारामध्ये केवळ बोकड पालनाचा नवा मार्ग म्हसरूळ (ता.जि. नाशिक) येथील पद्माकर मोराडे यांनी चोखाळला आहे. आदिवासी शेतकऱ्याबरोबरच्या या नव्या करार पद्धतीमुळे शेळीपालनातील धोके कमी करत, व्यवस्थापन खर्चात बचत साधली आहे.
ज्ञानेश उगले

नाशिक दिंडोरी रस्त्यावर असलेल्या म्हसरूळ गावालगत पद्माकर मोराडे यांची ७ एकर शेती आहे. त्यापैकी अर्ध्या एकरात अर्धबंदिस्त रचनेचे शेड उभारले असून, त्यामध्ये ५०० सिरोही बोकडाचे पालन केले जाते. होय, शेळ्यांचे नव्हे तर केवळ बोकडाचे पालन केले जाते. त्यासाठी त्यांनी पारंपरिक शेळीपालनाच्या तुलनेमध्ये हा वेगळा प्रयोग केला असून, गतवर्षी ५०० बोकडांची पहिली बॅच विकली असून, त्यातून चांगला फायदा मिळाला आहे.

संवेदनशील घटकांचे प्रमाण केले कमी -
आपल्या अनोख्या ‘बोकड फार्म’विषयी माहिती देताना पद्माकर मोराडे म्हणाले, की शेळीपालन चांगला शेतीपूरक व्यवसाय असल्याचे जाणून होतो. तो करायचा म्हणून त्याचा चार पाच वर्षांपासून अभ्यासही सुरू होता. ‘ॲग्रोवन’मधील शेळीपालनावरील प्रत्येक लेखाची कात्रणे काढून मी ती जपली आहेत. या शिवाय अनेक पुस्तकेही वाचली. राज्यातील अनेक शेळीपालन प्रकल्प पाहण्यासाठी भ्रमंती केली. जिद्दीने यशस्वी शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्याबरोबर अयशस्वी शेळीपालकांनाही भेटलो. त्यांच्याशी बोलताना शेळीपालनातील सर्वांत महत्त्वाची बाब माझ्या लक्षात आली, ती म्हणजे शेळ्यांची लागण, गाभणकाळ, संबंधित रेकॉर्ड ठेवणे, बाळंतपण करणे या बाबी फारच जिकिरीच्या ठरतात. त्यात शेळीपालकाचा वेळ आणि ऊर्जा अधिक खर्च होते. मग एक वेगळीच कल्पना मनात घोळू लागली. मनातील कल्पनेचा नीट विचार करून तिचा पाठपुरावा केला.

- सिरोही जातीच्या शेळी ही मांस उत्पादनासाठी, वजनासाठी चांगल्या असून, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते. अशा शेळ्यांचे पालन राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यातील शिवगंज तालुक्यातील देवासी आदीवासी समाज मोठ्या प्रमाणावर करत असल्याचे समजले. त्या विभागातील ११६ शेळीपालकांकडून एक हजार शेळ्या व १५० बोकडांची खरेदी केली. मात्र या शेळ्यांचे संगोपन आदिवासी लोकांनी करावयाची बोली केली. या संगोपनाच्या बदल्यामध्ये त्यांना जन्मलेल्या पिलांतील मादी पिले, दूध आणि खत मिळते. मात्र दर शेळीमागे ७ महिन्यांनी एक बोकड मोराडे यांना द्यायचा असे ठरले. त्यामुळे दर सात महिन्यांनी १००० बोकड त्यांना उपलब्ध होतात.
- या शेळ्यांच्या पहिल्या वेताची ५०० नर पिले मोराडे यांनी ऑगस्ट २०१५ मध्ये म्हसरूळ येथील शेतावर आणले. ही पिले दूध पिण्याचा काळ संपल्यानंतर म्हणजेच साधारणपणे अडीच ते तीन महिने वयाची असतात.
..असे आहे गोठा व्यवस्थापन -
अर्धा एकर क्षेत्रामध्ये अर्धबंदिस्त पद्धतीचा गोठा उभारला आहे. १०५ फूट बाय ५५ फूट आकारांचे १० ते १४ फूट उंचीचे बंदिस्त शेड असून, शेडच्या दोन्ही बाजूंस ३० फूट बाय १०० फूट इतकी मोकळी जागा सोडली आहे. शेडमध्ये जमिनीपासून १ फूट उंचावर सिमेंट कोबा केला असून, दोन्ही बाजूंस २० फूट बाय २० फूट या अंतराचे ५ भाग केले आहेत. बोकडांसाठी शेड, पाण्याची टाकी, चारा पालापाचोळा खावयास मोकळी जागा अशी अर्धबंदिस्त रचना या बोकड फार्मची आहे.

- बोकडाच्या नैसर्गिक वाढीसाठी त्यांना ठराविक वेळी चरावयास शेडच्या बाहेर सोडले जाते. तसेच ठराविक वेळी संतुलित आहार दिला जातो.
- पशुवैद्यकांमार्फत बोकडांची नियमित आरोग्य तपासणी होते.
- आहारात गहू, मका, तांदूळ, भरडा, सरकी ढेप यांचा भरडा दिला जातो.
- परिसरातील निम, चिंच आदी मोठ्या झाडांच्या फांद्या वरून तोडून चारा म्हणून दिल्या जातात.
- उपचार व आहारात आयुर्वेदिक औषधींचा वापर केला जातो.
- बोकडांसाठी संपूर्ण शुद्ध पाणी दिले जाते.

बोकडांसाठी वाजवले जाते शास्त्रीय संगीत -
शेडमध्ये सकाळी (साडेसहा ते साडेसात) व संध्याकाळी (साडेसात ते साडेआठ) शास्त्रीय संगीत ऐकविले जाते. त्याचा त्यांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत बोकडांना खुल्या जागेत सोडले जाते. त्यामुळे निसर्गाच्या वातावरणात राहण्याचे समाधान बोकडांना मिळते.

आहार व पाणी व्यवस्थापन -
१) आहारात ६० टक्के कोरडा चारा व ४० टक्के हिरवा चारा व कडधान्ये हे गुणोत्तर वजनवाढीला उपयुक्त ठरते.
-सकाळी साडेआठ वाजता : भरडा (मका+गहू+तांदूळ)
-सकाळी साडेनऊ वाजता : हिरवा चारा (गवत, घासाची कुट्टी)
-दुपारी : कोरडा चारा, सोयाबीनचे भूस, मक्‍याची कुट्टी
-दुपारी ४ वाजता : मका
- सायंकाळी ७ वाजता : घास
२) बोकडांना गरजेनुसार ठराविक वेळेतच पाणी दिले जाते. वेळा ठरलेल्या असल्यामुळे बोकडांत स्वयंशिस्त राहते. आहारात पाणी जास्त झाल्यास आहार व पाण्याचे गुणोत्तर बिघडून, त्याचा वजनावर विपरीत परिणाम होत असल्याचे मोराडे यांचे मत आहे.
३) दोन एकर क्षेत्रामध्ये यशवंत गवत आणि चारा लागवड केली आहे. त्याच बरोबर अन्य शेतकऱ्यांना रोज दोन टन मका चारा बाजारभावाप्रमाणे खरेदी केला जातो.
४) चारा साठविण्याची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. गहू, मका, तांदूळ आदी आहारासाठीचा माल थेट शेतकऱ्यांकडून खरेदी केला जातो. सद्यःस्थितीत त्यांनी १० हजार पोती मका खरेदी केला आहे.
बोकडपालन प्रकल्पासाठी मजुराच्या ४ जोड्या नियमितपणे काम करतात.

अर्थशास्त्र -
- पहिली ५०० बोकडांची बॅच डिसेंबर २०१५ मध्ये बाजारात विकली. मुंबई येथील देवनार, मुंब्रा बाजारात मागील बॅचला २६० रुपये प्रति किलो असा दर मिळाला. एका बोकडाचे वजन सरासरी ३५ किलो भरते. म्हणजे एका बोकडाला ९१०० रुपये दर मिळाला. म्हणजे एका बॅचमधून ४५ लाख ५० हजार इतके उत्पन्न मिळाले. एक बोकड त्यांना चार ते साडेचार महिने सांभाळावा लागतो. त्यासाठी घरचा चारा असल्याने प्रतिमाह पाचशे रुपये खर्च होतो.
- सद्यःस्थितीत पाण्याची टंचाई असल्याने केवळ २५० बोकड ठेवले आहेत. उर्वरित बोकडांची विक्री केली. सध्या असलेले ४ महिने वयाचे बोकड आणखी २ महिन्यांनी बाजारात विक्रीसाठी काढण्यात येतील.
- नवीन बोकडाची बॅच पाऊस पडल्यानंतर साधारणतः १५ जुलैच्या आसपास आणण्याचे नियोजन आहे.

शेळीपालनामध्ये हे करायलाच हवे...
* शेळीपालन, बोकडपालनामध्ये व्यावसायिकता जपली पाहिजे.
* प्रत्येक खर्चाची नोंद आवश्‍यक.
* स्वत:च्या शेतातील चारा असल्यास उत्पादन खर्च कमी होतो.
* गोठ्यात संपूर्ण स्वच्छता हवी.
* पुरेशा प्रमाणात व वेळेवर आहार व्यवस्थापन हवे.
* लसीकरण, औषधोपचार वेळेवरच हवे.
* मरतूक झाल्यास घाबरून न जाता नियोजन करावे.

मोराडे यांचे गुणविशेष :
१) व्यवसायाचा सर्वांगीण अभ्यास
२) शक्तीस्थाने व संधीबरोबरच कमतरता व धोके यांची माहिती घेत, धोके कमी करण्यासाठी केला प्रयत्न.
३) उत्तम व्यवस्थापन. वेळेचे व कामांचे उत्तम नियोजन.

संपर्क - पद्माकर मोराडे, ९७६३०९७४११

22/05/2016
15/05/2016

संकरित नेपिअरची लागवड

जनावरांच्या समतोल आहारामध्ये वैरण, हिरवा चारा, आंबवण, खनिज पदार्थ, जीवनसत्त्वे, पाणी यांचा समावेश होतो. त्यात सुमारे 70 टक्के भाग हा हिरवा चारा असतो. त्यामुळे लुसलुशीत व पौष्टिक चाऱ्याचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी संकरित नेपिअर हे बहुवार्षिक गवत महत्त्वाचे ठरते.
सर्वसाधारणपणे पूर्ण वाढलेल्या दुभत्या जनावराला दिवसाला 24 ते 25 किलो हिरवा चारा आणि 5 ते 6 किलो कोरडा चारा लागतो. समतोल आहाराच्या दृष्टीने एकदल व द्विदल चाऱ्याचे प्रमाण निम्मेनिम्मे असावे. 12 ते 13 किलो एकदल वर्गीय हिरवा चारा (उदा. ज्वारी, बाजरी, मका, ओट, संकरित नेपिअर इ.) तर 12 ते 13 किलो द्विदल वर्गीय हिरवा चारा (उदा. लसूण घास, बरसीम, चवळी इ.) यांचा समावेश करावा. एकदल चाऱ्यामध्ये शर्करेचे प्रमाण जास्त असते, तर द्विदल चाऱ्यामध्ये प्रथिने, कॅल्शिअम यांचे प्रमाण जास्त असते.

जमिनीची निवड
संकरित नेपिअर (फुले जयवंत) हा वाण सर्व प्रकारच्या जमिनीत वाढतो. तथापि खोल, मध्यम ते भारी, काळी कसदार उत्तम निचऱ्याची सुपीक गाळ फेरातील जमिनीची निवड करावी. यामुळे गवताची वाढ जोमाने होऊन फुटवे चांगले येतात. भरपूर हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते. हा वाण 5 ते 8 सामू असलेल्या जमिनीत चांगल्या प्रकारे वाढू शकतो.

हवामान - हे गवत 24 अंश ते 40 अंश सेल्सिअस या तापमानात चांगले वाढते. 15 अंश सेल्सिअसपेक्षा खाली तापमान गेल्यास या गवताची वाढ खुंटते.
उन्हाळ्यात व पावसाळ्यात या गवताची वाढ अत्यंत उत्कृष्ट होते. पावसाच्या हलक्‍या सरी व त्यानंतर स्वच्छ सूर्यप्रकाश या वाणाच्या वाढीकरिता हितावह असतो.
हिवाळ्यात हे गवत सुप्त अवस्थेत राहते. त्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नाही.

सिंचनाची सोय असल्यास व खते योग्य प्रमाणात वापरल्यास या गवताची लागवड तीन वर्षांपर्यंत टिकते.
पूर्वमशागत - जमिनीची खोल मशागत करून, कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवाच्या वेळी हेक्‍टरी 10 टन चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे.
लागवडीचा हंगाम - या गवताची लागवड उन्हाळ्यात फेब्रुवारी ते मार्च या काळात करावी. खरीप हंगामात (पावसाळ्यात) जून ते ऑगस्ट मध्येही लागवड करता येते.

लागवडीची पद्धत
या गवताची ठोंबे (मुळासह) लावावीत. लागवडीकरिता साधारणपणे तीन महिने वाढू दिलेल्या गवताच्या खोडाचा जमिनीकडील दोन तृतीयांश भागातील दोन ते तीन डोळे असणाऱ्या कांड्या काढून लावाव्यात.
या गवताची लागवड 90 x 60 सें.मी. अंतरावर करावी. गवताचे ठोंब 90 सें.मी. अंतरावर काढलेल्या सरीच्या बगलेत मुळासहित गवताची ठोंब अथवा डोळे असणाऱ्या कांड्याद्वारे लागवड करावी.
दोन डोळे जमिनीत व एक जमिनीवर राहील अशा पद्धतीने लागवड करावी. दोन झाडांमध्ये 60 सें.मी. अंतर ठेवावे. एका ठिकाणी एक जोमदार ठोंब लावल्यास हेक्‍टरी 18,500 ठोंब पुरेसे होतात.

खत व्यवस्थापन
लागवडीच्या वेळी प्रति हेक्‍टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यावे, तसेच प्रत्येक कापणीनंतर 25 किलो नत्र प्रति हेक्‍टरी द्यावे.
पाणी व्यवस्थापन - संकरित नेपिअर गवताला उन्हाळी हंगामात 7 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. खरीपमध्ये गरजेनुसार 15 दिवसांचे अंतराने, हिवाळ्यात 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
आंतरमशागत - सुरवातीच्या वाढीच्या काळात एक किंवा दोन खुरपण्या देणे आवश्‍यक आहे. त्यानंतरची खुरपणी गरजेनुसार करावी. दरवर्षी उन्हाळ्यात चाळणी (खांदणी) करून मातीची भर झाडास द्यावी. प्रत्येक वर्षी एक ठिकाणी 2 ते 3 फुटवे ठेवून इतर जादा फुटवे लागवडीकरिता नवीन ठिकाणी वापरावेत. यासाठी मर झालेले फुटवे पुंजक्‍यातून काढून टाकावेत. जोमदार 2 ते 3 फुटव्यांना वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण करावे.

कापणी व उत्पादन या गवताची हिरव्या चाऱ्यांसाठी पहिली कापणी 60 ते 65 दिवसांनी करावी. कापणी जमिनीपासून साधारण 15 ते 20 सें.मी. उंचीवर केल्यास फुटवे चांगले फुटण्यास मदत होते. नंतरच्या कापण्या पीकवाढीनुसार 45 ते 50 दिवसांनी कराव्यात. अशा प्रकारे वर्षभरात 6 ते 7 कापण्या घेता येतात.

कापणीस उशीर झाल्यास गवत जास्त वाढते. त्यामुळे ते जाड टणक व जास्त तंतुमय होते. पौष्टिकतेचे प्रमाण कमी होते. शिवाय कापण्यांची संख्याही कमी होते.
शक्‍यतो कडबा कुट्टीमध्ये गवत बारीक करून द्यावे.
साधारणपणे प्रतिवर्षी 100 ते 150 टन हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते.

सुधारित वाणाविषयी अधिक माहिती
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील गवत संशोधन प्रकल्पाने संकरित नेपिअर गवताचे "फुले जयवंत' (आर.बी.एन.-13) हे वाण विकसित केले आहे.

"फुले जयवंत' वाणाच्या हिरव्या चाऱ्यात ऑक्‍झिलिक आम्लाचे प्रमाण हे 1.91 टक्के आहेत.
त्यात प्रथिने 10.35 टक्के, स्निग्ध पदार्थ 2.38 टक्के, खनिजे 12.32 टक्के, तसेच चाऱ्याची एकूण पचनीयता 61.8 टक्के आहे.
तसेच पानांवर कूस कमी प्रमाणात असल्याने जनावरे आवडीने खातात.

संपर्क - डॉ. सिनोरे, 9423732876
(महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

13/05/2016

शेळी लसिकरणचे वेळापत्रक बाबत माहिती
निtesh खंडारे

शेळी पालन करताना शेळ्या ह्या अनेक आजाराला बळी पडतात त्यामुळे आपले नुकसान सुद्धा होते. Precaution better than cure या इंग्रजीच्या म्हणी प्रमाणे जर आपण जर आधीच काळजी घेतली तर आपण शेळी पालनात उन्नति करू शकतो.

शेळ्यां वरील आजार हे हवमाना तसेच साथी वर अवलंबून असतात. आणि विशेष म्हणजे हे आजार संसर्ग जन्य असल्यामुळे एका शेळी पासून दुसऱ्या शेळ्याना होतात परिणामी होणारे नुकसान हे मोठ्या प्रमाणात होऊ शकते.

करिता शेळीला जर आपण नियमित व वेळापत्रका नुसार लसिकरण केले तर आपण होणारी जीवित हानि पर्यायी नुकसान थांबवु शकतो.

शेळीना दिल्या जाणाऱ्या लसिकरणा चे वेळापत्रक आहे

1) Anthrax (अँथ्रlक्स)
या आजारवरील लसिकरण हे सहा महिन्याच्या करडाला दयावे लागते
संक्रमित झालेल्या जागेवर वर्षातुन एकदा दयावे लागते.

2) Haemorrhagic Septicemia (H.S) घटसर्प
या आजारवरील लसिकरण हे सहा महिन्याच्या करडाला दयावे लागते
हे लसिकरण दर वर्षी पावसाळ्याच्या आधी दयावे लागते.

3) Enterotoxaemia आंतर विषबाधा
या आजारवरील लसिकरण हे चार महिन्याच्या करडाला दयावे लागते
हे लसिकरण दर वर्षी पावसाळ्याच्या आधी दयावे व् बूस्टर डोस हा पहिला डोस दिल्याच्या 15 दिवसांनी दयावा.

4) Black Quarter (B.Q)
या आजारवरील लसिकरण हे सहा महिन्याच्या करडाला दयावे लागते. हे लसिकरण दर वर्षी पावसाळ्याच्या आधी दयावे लागते.

5) PPR
या आजारवरील लसिकरण हे तिन महिन्याच्या करडाला दयावे लागत हे लसिकरण 3 वर्षातुन एक वेळा दयावे.

6) Foot and Mouth (FMD)
या आजारवरील लसिकरण हे चार महिन्याच्या करडाला दयावे लागते हे लसिकरण वर्षातुन दोन वेळा दयावे. (सप्टेम्बर आणि मार्च मध्ये दयावे)

7) Sheep Pox
या आजारवरील लसिकरण हे तिन महिन्याच्या करडाला दयावे लागते. वर्षातुन एक वेळा (डिसेम्बर महिन्यात)

8) CCPP
या आजारवरील लसिकरण हे तिन महिन्याच्या वरील करडाला दयावे लागते. वर्षातुन एक वेळा (जानेवारी महिन्यात)

9) Goat Pox
या आजारवरील लसिकरण हे तिन महिन्याच्या वरील करडाला दयावे लागते वर्षातुन एकदा (डिसेम्बर मध्ये)

वरील सर्व लसिकरण हे शेळ्यां मेंढ्या च्या करडाना दयाव्याचे आहेत.
निtesh खंडारे

शेतकऱ्यांसाठी सरकारच्या टॉप 8 बेवसाईट्सशेतकऱ्यांना परिस्थितीचा सामना करता यावा तसेच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या घालाव्या...
08/05/2016

शेतकऱ्यांसाठी सरकारच्या टॉप 8 बेवसाईट्स
शेतकऱ्यांना परिस्थितीचा सामना करता यावा तसेच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या घालाव्या लागू नयेत म्हणून सरकारने अनेक वेबसाईट आणि पोर्टल्स उपलब्ध करुन दिलेले आहेत.

ज्याद्वारे शेतकऱ्यांना अनेक हिताच्या योजनांची घरबसल्या माहिती घेता येऊ शकते. शिवाय कृषी विभागाचे मार्गदर्शनही मिळवता येऊ शकते.

1. माती आरोग्य कार्ड योजना

मातीचं आरोग्य तपासून पीक घेण्यासाठी शासनाकडून सॉईल हेल्थ कार्ड ही योजना सुरु करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी कार्ड मिळवण्यासाठी जवळच्या सेतू किंवा इंटरनेट सुविधा उपलब्ध असेल अशा ठिकाणी जाऊन www.soilhealth.dac.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर या पोर्टलमध्ये आपले स्वतःचे खाते तयार करावे लागते. या कार्डअंतर्गत त्या भागातील प्रयोगशाळेत मातीचे आरोग्य तपासले जाते. त्यावरुन संबंधित शेतातील मातीत कोणते पीक चांगले येऊ शकेल, त्याला पोषक औषधे आणि त्यांचे प्रमाण कसे असावे, याची माहिती मिळवता येते. या सुविधेमुळे शेतकरी आपल्या शेतीला पोषक असे पिक घेऊ शकतात. या संकेतस्थळावर मराठी भाषेसह एकूण 22 भाषांचा पर्याय उपलब्ध आहे.

2. शेतकरी पोर्टल

शेतकरी www.farmer.gov.in या संकेतस्थळावर गेल्यानंतर त्यांचे गाव, गट, जिल्हा किंवा तालुका निवडावा लागतो. त्यानंतर आवश्यक त्या पीकासंबंधित माहिती किंवा किटकनाशके, पीककर्ज यांबाबत सर्व विस्तृत माहिती या वेबसाईटवर मिळते. ही माहिती आपल्याला समजणाऱ्या भाषेतील मजकूर, एसएमएस, ई-मेल किंवा ऑडिओ किंवा व्हिडीओ अशा स्वरुपात दिली जाते. गृहपृष्ठावर देण्यात आलेल्या भारताच्या नकाशाद्वारे सहजपणे या पातळ्यांवर जाता येते. शेतकऱ्यांना विशिष्ट प्रश्न विचारता येतील तसेच प्रतिक्रियाही देता येते.

3. मेरा किसान पोर्टल

हे एक मोबाईल किसान पोर्टल म्हणून परिचित आहे. www.mkisan.gov.in या वेबसाईटवर शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत विविध प्रकारची माहिती मिळवता येते. त्यासाठी अगोदर या संकेतस्थळाचा सदस्य होणं आवश्यक आहे. त्यानंतर शेतकरी थेट अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतात. तसेच मोबाईल सेवेद्वारे एसएमएसद्वारेही माहिती मिळवू शकतात. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्हीही भाषांचा पर्याय या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

4. पंतप्रधान पीक विमा योजना

शेतकऱ्यांवर विम्याचे कवच असावे यासाठी सरकारने ही योजना सुरु केली. या योजनेतर्गत प्रत्येक पिकावर विमा पद्धत उपलब्ध आहे. www.agri-insurance.gov.in या वेबसाईटवर मेंबर होणं गरजेचे आहे. त्यानंतर विम्यासाठी ऑनलाईन अर्जही करता येतो. स्वत:शी संबंधित सर्व माहिती भरल्यानंतर हिंदी भाषेत पुढील पर्याय उपलब्ध आहेत.

5. पंतप्रधान कृषी विकास योजना

शेतकरी पावसावर अवलंबून असतो. मात्र हे अवलंबित्व कमी करुन प्रत्येक शेतात पाणी पोहचवण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली. शेतात पाणी साठवणे, सिंचन आणि जलसंधारणाचे विविध पर्याय www.pmksy.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सोबतच शासनाच्या या उपक्रमांतर्गत येणाऱ्या सर्व योजनांची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

6. राष्ट्रीय शेती बाजार

शेतकऱ्यांना त्यांचा माल आवडत्या बाजारात विकता यावा किंवा ग्राहकांना कोणत्या मालाचा बाजारबाव काय आहे याची घरबसल्या माहिती घेता यावी या उद्देशाने राष्ट्रीय शेती बाजार या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. agmarknet.dac.gov.in या संकेतस्थळावर जाऊन शेती मालाचा सध्याचा बाजारभाव तसेच ग्राहकांनाही ऑनलाईन बाजारभाव पाहता यावा याविषयीचे पर्याय उपलब्ध आहेत. पीक निवडून राज्य, जिल्हा, तालुका आणि जवळची बाजारपेठ निवडणे असे पर्याय या संकेतस्थळावर आहेत.

7. ई-राष्ट्रीय शेती बाजार

राष्ट्रीय शेती बाजार या योजनेप्रमाणेच शेतीमाल विक्री किंवा बाजारात शेतीमाल येण्याची वेळ, बाजारभाव आणि खरेदी विक्री यांची माहिती www.enam.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. सध्या या संकेतस्थळावर देशभरातील काही मुख्य बाजारपेठांचा समावेश केला आहे. त्या बाजारपेठेमध्ये सध्या कोणत्या शेतीमालाला काय बाजारभाव मिळत आहे, हे पाहता येते. सोबतच ग्राहकांना देखील या संकेतस्थळाद्वारे खरेदी करण्यासाठी बाजारभावाविषयी खात्रीशीर माहिती मिळवता येते.

8. राष्ट्रीय यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञान पोर्टल

शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीची कास धरायला लावणे हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. www.farmech.dac.gov.in या वेबसाईटला भेट दिल्यानंतर शेतीत आधुनिकीकरण कसं आणावं याबाबत सर्व माहिती उपलब्ध आहे. कोणत्या पिकासाठी कोणत्या यंत्राचा कसा वापर करावा ते या वेबसाईटवर व्हिडीओसह उपलब्ध आहे. यामुळे आधुनिक पद्धतीने शेती करण् सोप आहे...

21/04/2016

ऍग्रो प्लस

ShareFavoriteBack

फायदेशीर कडकनाथ कोंबड्या

कडकनाथ कोंबड्यांतील औषधी गुणधर्मामुळे त्यांच्या अंडी व मांसाला चांगली मागणी व भाव आहे. कोणत्याही वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता अतिशय चांगली असल्यामुळे या कोंबड्यांच्या खाद्यावर व व्यवस्थापनावर अधिक लक्ष केंद्रित केल्यास चांगला फायदा होऊ शकतो.
डॉ. रवींद्र काळे, डॉ. डी. एल. रामटेके

कडकनाथ कोंबड्या उंच व काळ्या रंगाच्या असून, त्यांची कोणत्याही वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता अतिशय चांगली आहे. या कोंबड्या मध्य प्रदेशातील झाबुआ आणि धार जिल्ह्यामध्ये अाढळतात. या कोंबडीचे मांस रंगाने काळे असून, चविष्ट व औषधी आहे. गावरान कोंबड्यासोबत कडकनाथ कोंबड्याचे संगोपन करता येते.

अाैषधी गुणधर्म
- कडकनाथ कोंबडीच्या मांसामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असून, कोलेस्टेराॅलचे प्रमाण अतिशय कमी अाहे. त्यामुळे हृदय रोग असलेल्यांना कडकनाथ कोंबडीचे मांस उपयुक्त अाहे.
- या पक्ष्यांची रोगप्रतिकारशक्ती अतिशय चांगली असून, कोंबडीचे मांस चविष्ट असते.
- कडकनाथ पक्ष्यांची अंडी व मांस उच्च रक्तदाब, डोकेदुखी, दमा व मूत्रपिंडाची सूज, कॅन्सर, नपुंसकता इ. रोगावर गुणकारी अाहे.
- मांस व अंड्यामध्ये आवश्‍यक अशा अमिनो आम्लाचे प्रमाण, संप्रेरके, जीवनसत्त्व ब१, ब२, ब६, ब१२ आणि ई, नायासिन, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह यांचे प्रमाण भरपूर असते.

अ. क्र. ---गुणधर्म---कडकनाथ कोंबडी---सामान्य कोंबडी
१---प्रथिने (टक्‍के)---२५---१८-२०
२---स्निग्ध पदार्थ (टक्‍के)---०.७३ -१.०३---१३-२५
३---लिनिओलिक आम्ल (टक्‍के)---२४---२१
४---कोलेस्टेरॉल (मि.ग्रॅ./१०० ग्रॅम)---१८४.७५---२१८.१२

व्यवस्थापन -
- अंडी उबवण केंद्रातून आणलेली पिले ४८ तासांच्या आत पिलांसाठी तयार केलेल्या उबवण गृहामध्ये (ब्रुडर हाउस) स्थानांतरित करावीत. पिले पारखून निरोगी असल्याची खात्री करून घ्यावी.
- खाद्याची व पाण्याची भांडी स्वच्छ व निर्जंतुक करून घ्यावीत.
- उबवण गृहामध्ये दोन इंच जाडीचा साळीचा थर गादीसारखा अंथरावा. त्यावर पाच-सहा थरांमध्ये जुनी वर्तमानपत्रे पसरावीत.
- पिले उबवण गृहामध्ये आणण्याच्या २४ तास आधीच ब्रुडरच्या तापमानाची खात्री करून घ्यावी.
- पिलांना उबेच्या स्रोताजवळ ठेवण्यासाठी व्होवर गार्ड किंवा टीनच्या गोलाकार पत्र्याचा उपयोग करावा.
- पिलांना श्‍वसनाचे रोग, तसेच शरीरामध्ये पाण्याची कमतरता होऊ नये, त्याकरिता खोलीतील आर्द्रता ४० टक्‍क्‍यांच्या वर ठेवावी.
- पिले उबवण गृहामध्ये एकाच ठिकाणी जमा होऊ नये, घराचे तापमान सगळीकडे सारखेच राहील यासाठी योग्य ती काळजी घ्यावी.
- पिलांना सुरवातीच्या १५ तासांपर्यंत आठ टक्के ग्लुकोजचे पाणी द्यावे.
- पिलांना उबवण गृहामध्ये पाणी पाजूनच सोडावे. उबवण गृहामध्ये खेळती हवा असावी.
- पिलांना शिफारशीप्रमाणे खाद्य द्यावे. त्यामध्ये काटेकोरपणा पाळावा.
- खाद्याची व पाण्याची भांडी पिलाच्या संख्येनुसार योग्य प्रमाणात असावीत. साधारणतः १० पिलांसाठी एक पाण्याचे व एक खाद्याचे भांडे असावे.
- मांसल, तसेच अंडी देणाऱ्या अशा दोन्ही पिलांना वेगवेगळा आहार द्यावा.
- या पक्ष्यांना चिकमॅश, लेअरमॅश तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार द्यावे.

वैशिष्ट्ये
१. पिलाचे वजन - २८-२३ ग्रॅम
२. आठ आठवड्यांनंतरचे वजनः- ०.८४१ किलो
३. १ किलो वजनासाठी लागणारा कालावधी - २० आठवडे
४. जगण्याची क्षमता - ९४ टक्के
५. पूर्ण वाढ झालेल्या नराचे वजन - २.२ - २.५ किलो
६. पूर्ण वाढ झालेल्या मादीचे वजन - १.५ - १.८८ किलो
७. चव - गावरान कोंबडीप्रमाणे
८. मांसाचे प्रमाण (त्वचेचे सोडून) - ६५ टक्के
९. प्रतिमहिना अंडी उत्पादन - ११- १३ नग
१०. वार्षिक अंडी उत्पादन - ६० ते ८० नग
११. अंड्याचे वजन - ३५ - ४० ग्रॅम

संपर्क - डॉ. डी. एल. रामटेके, ९४२३६११७००
(कृषी विज्ञान केंद्र, करडा, जि. वाशीम)

06/02/2016

@@@@@ शेळीपालन सूरू करणेपूर्वी प्राथमिक बाबींची माहिती @@@@@@

शेळीपालन सूरू करणेपूर्वी प्राथमिक बाबींची माहिती घेणे आवश्‍यक आहे जसे की-
1)शेळीपालन अनूभव- नवीन शेळीपालकांसाठी तसेच पारंपारीक शेळीपालकांना आधूनिकपणे शेळी पालन करणे महत्‍वाचे आहे.यासाठी प्रशिक्षण घेतल्‍यास शेळीपालनातील नवीन गोष्‍टी व सावधगिरीच्‍या बाबी तूम्‍हाला अगोदरच समजून येतील.
2)सोईसुविधा- शेळीपालनात पाळलेल्‍या जनावरांना वेळच्‍या वेळी संतूलीत चारा व खूराक, लहान व मोठया जनावरांची काळजी,योग्‍य गोठा,पाणी,लसीकरण,प्रथमोपचार इ साठीची सोय तूमच्‍याकडे उपलब्‍ध पाहिजे.उदा - एक एकरात हत्‍ती गवत [फूले जयवंत / बायफ १० ] ,मेथी घास,म्‍यलॅटो,कडवळ / मका तसेच शेवरी,सूबाभळ [नारी निर्बीजा],शेवगा, हादगा इ प्रकल्‍प सूरू होण्‍यापूर्वी लावल्‍यास ३०-३२ शेळया आपण पाळू शकतो.ही सूविधा किंवा अशा प्रकारच्‍या इइतर सूविधा शेळीपालकाकडे असणे आवश्‍यक आहे.
3)मूल्‍यवर्धन- शेळीपालकाने स्‍वतः कडील बाबीमध्‍ये मूल्‍यवर्धन करावयास हवे,जसे की लहान पिले,मादया ,नर वेगवेगळया कप्‍यात ठेवणे,त्‍यांना खूराक देणे,रोगप्रतिबंधात्‍मक उपाय योजने इ.
4)बाजार- मटणाचे मार्केटींग स्‍वतः करणे इ.
5)कर्ज- निरनिराळया बँकामधील कृषि अधिका-यांना भेटून कर्ज प्रकरणाची चाचपणी करणे.त्‍यासाठी लागणा-या कागदपत्राँची पूर्तता करणे.
अलीकडे शेळीपालन व्यवसायास बरेच महत्व येत असून तो एक स्वतंत्र व्यवसाय झाला आहे हा व्यवसाय करणा-या पशुपालकांची संख्या मोठया प्रमाणावर वाढते आहे. त्याचप्रमाणे इतर व्यावसायिक मंडळी देखील या व्यवसायात पडू पाहत आहेत शासनही या व्यवसायाला आर्थिक सहाय देत आहे त्याचप्रमाणे शेळीच्या मांसाची मागणीही दिवसेंदिवस वाढतच आहे काही ठराविक जातीच्या शेळया दर दिवशी सरासरी दोन ते अडीच लिटर दूध देतात त्यामुळे हा व्यवसाय अधिकच लोकप्रिय होत आहे.
शेळी पालनाचे फायदे-
1) अल्प गुंतवणुकीने हा व्यवसाय केल्या जाऊ शकतो
2) शेळया या शेतक-यांसाठी बचत बॅकेचे कार्य करीत असतात आवश्यकता पडल्यास त्वरीत काही शेळया विकून पैसा उभा केला जाऊ शकतो.
3) शेतक-यास दूध विकत घेणे शक्य नसल्यामुळे शेळीचा दुधाचा वापर करणारे ग्रामीण लोक मोठया प्रमाणावर आढळतात.
4) शेळया काटक असून विपरीत हवामानाशी जुळवून घेतात.
5) शेळया निकृष्ट प्रतिच्या चा-याचे मांसात किंवा दुधात रूपांतर करतात.
6) शेळयांचे दोन पिढीतील अंतर कमी असून लवकर उत्पादन मिळते.
7) त्यांना जागा कमी लागते यामुळे निवा-याकरिता खर्च कमी होतो.
8) काही जातीच्या शेळयापासून लोकर (मोहोर) मिळते.
9) शेळयांचे खत उत्तम असते.
10) आपल्या देशात गोमांस कुणी खात नाही म्हणून शेळीच्या मांसाला जास्त मागणी आहे.
11) शेळयांच्या शिंगापासून डिंकयुक्त पदार्थ बनवितात.
12) शाकाहारी अन्नात कमी असणारे अमिनो आम्ल उदा लायसिन, मिथिओन व ट्रिप्टोफॅन शेळीच्या मासांत अधिक असते.
13) शेळीपालन व्यवसाय हा महिलांमार्फत सहज केल्या जावू शकतो.
भारतीय अर्थव्यवस्थेत शेळयांचे महत्व जगात एकंदर 620 दशलक्ष शेळया असून त्यापैकी 123 दशलक्ष शेळया भारतात आहे शेळयांच्या संख्येने जरी भारत प्रथम क्रमांकावर असला तरी त्यापासून मिळणारे उत्पन्न फार कमी आहे देशातील दुध, मांस, व कातडीच्या एकंदर उत्पादनापैकी 3 टक्के दुध 45 ते 50 टक्के मांस तर 45 टक्के कातडी शेळयापासून मिळते. भारतात शेळयांचे 50 टक्के मांस तर 45 टक्के कातडी शेळयापासून मिळते भारतात शेळयांचे सरासरी वार्षिक दूध उत्पादन फक्त 58 लिटर आहे व शेळीच्या दुधाला मागणी नाही खरं तर शेळीचा विकास दुध उत्पादनाकरीता झालाच नाही आपल्या कडील निवडक जातीच्या शेळया एका वेतात 200 ते 250 लिटर दुध देतात तर विदेशी जातीच्या शेळया 1200 ते 1700 लिटर दुध देतात.
आपल्या देशात शेळयापासून वर्षाकाठी 2.2 दशलक्ष टन मांस मिळते तर पश्मिना जातीच्या शेळीपासून लोकरही मिळते.
शेळयांच्या जाती
भारतात शेळयांच्या प्रमुख 25 जाती आढळतात आपल्याकडील जमनापरी बिंटल सुर्ती, मारवाडी, बारबेरी इत्यादी जाती दुध उत्पादनाकरिता तर बिटल, उस्मानाबादी, सुर्ती, अजमेरी, इत्यादी जाती लोकर उत्पादनाकरीता बिटल,उस्मानाबादी,सिरोही सुर्ती अजमेरी इत्यादी जाती लोकर किंवा मोहेर उत्पादनाकरीता वापरतात. या सर्व जातींची वाढ मंद गतीने होते साधारणपणे एका वर्षात सरासरी वजन 20 किलो होते या उलट विदेषी जातीच्या शेळया उदा सानेन, टोने, बर्ग, अल्पाईन, एम्लोन्यूबियन, अंगोरा इत्यादी सुधारित जाती फारच झपाटयाने वाढतात अफ्रिकेतील बोयर जातीच्या शेळया वजनदार जाती फारच झपाटयाने वाढतात. अफ्रिकेतील बोयर जातीच्या शेळया वजनदार असून नराचे सरासरी वजन 100 ते 125 किलो तर मादीचे सरासरी वजन 90 ते 100 किलो असते आपल्याकडे शुध्द जातीच्या शेंळया वापरावयाच्या असल्यास उस्मानाबादी किंवा संगमनेरी शेळया वापराव्या संकरित शेळया वापरल्यास अधिक उत्पन्न मिळते.वरील ठळक अक्षरात दिलेल्‍या शेळयांच्‍या जाती तूम्‍ही मटण / दूधासाठी पाळू शकता.
अर्धबंदीस्त शेळीपालनाची आवश्यकता -
शेळयांची चरण्याची पध्दत इतर गुरांप्रमाणे म्हणजे गाय, म्हैस मेंढी, यापेक्षा वेगळी असून त्या प्रत्येक झाडाचे झुडपे खातात जर आपण शेळयांचे अर्धबंदिस्त संगोपन केले तर त्यांची झपाटयाने वाढ होते.
अर्धबंदीस्त शेळीचे व्यवस्थापन -
1) शेळीकरीता कमी गुंतवणुकीचे वाडे (गाळे) असावे हेवाडे बास, बल्ली, तट्टे तु-हाटया
प-हाटया यांच्या सहायाने करावे
2) प्रती शेळी किमान 100 ग्रॅम खुराक दयावा प्रत्येक शेळीला किमान दिड ते 2 किलो हिरवा चारा दयावा झाडांची पाने दिल्यास उत्तम विविध झाडांची पाने उदा चिंच, बाभुळ, बोर, पिंपळ, सुबाभूळ, कंदब, निंब इत्यादी
3) शेळयांना मोकळया जागेत ठेवावे
4) कळपात 20 ते 25 शेळयामागे एक नर असावा
5) गाभळ शेळयाची व दुभत्या शेळयाची विशेष काळजी ध्यावी
6) करडांची जोपासना काळजीपुर्वक करावी
7) दिवसभरात किमान एक वेळा तरी शेळयांचे निरीक्षण करावे आजारby ी शेळयांना अगक करून पशुवैदयकांच्या सल्यानुसार औषधे दयावीत
8) शेळयाबांबत नोंदी ठेवाव्या व्याल्याची तारीख, शेळया फळल्याची तारीख मृत्यूच्या नोंदी इत्यादी

How to Make Quality Silage for Sheep and Goat | SheepFarm.in | SheepFarm.in - http://sheepfarm.in/make-quality-silage-sh...
06/02/2016

How to Make Quality Silage for Sheep and Goat | SheepFarm.in | SheepFarm.in - http://sheepfarm.in/make-quality-silage-sheep-goat

Silage is a fermented feed resulting from the storage of high moisture crops under anaerobic conditions in a structure known as silo.

06/02/2016

@@@@@ शेळीपालन सूरू करणेपूर्वी प्राथमिक बाबींची माहिती @@@@@@

शेळीपालन सूरू करणेपूर्वी प्राथमिक बाबींची माहिती घेणे आवश्‍यक आहे जसे की-
1)शेळीपालन अनूभव- नवीन शेळीपालकांसाठी तसेच पारंपारीक शेळीपालकांना आधूनिकपणे शेळी पालन करणे महत्‍वाचे आहे.यासाठी प्रशिक्षण घेतल्‍यास शेळीपालनातील नवीन गोष्‍टी व सावधगिरीच्‍या बाबी तूम्‍हाला अगोदरच समजून येतील.
2)सोईसुविधा- शेळीपालनात पाळलेल्‍या जनावरांना वेळच्‍या वेळी संतूलीत चारा व खूराक, लहान व मोठया जनावरांची काळजी,योग्‍य गोठा,पाणी,लसीकरण,प्रथमोपचार इ साठीची सोय तूमच्‍याकडे उपलब्‍ध पाहिजे.उदा - एक एकरात हत्‍ती गवत [फूले जयवंत / बायफ १० ] ,मेथी घास,म्‍यलॅटो,कडवळ / मका तसेच शेवरी,सूबाभळ [नारी निर्बीजा],शेवगा, हादगा इ प्रकल्‍प सूरू होण्‍यापूर्वी लावल्‍यास ३०-३२ शेळया आपण पाळू शकतो.ही सूविधा किंवा अशा प्रकारच्‍या इइतर सूविधा शेळीपालकाकडे असणे आवश्‍यक आहे.
3)मूल्‍यवर्धन- शेळीपालकाने स्‍वतः कडील बाबीमध्‍ये मूल्‍यवर्धन करावयास हवे,जसे की लहान पिले,मादया ,नर वेगवेगळया कप्‍यात ठेवणे,त्‍यांना खूराक देणे,रोगप्रतिबंधात्‍मक उपाय योजने इ.
4)बाजार- मटणाचे मार्केटींग स्‍वतः करणे इ.
5)कर्ज- निरनिराळया बँकामधील कृषि अधिका-यांना भेटून कर्ज प्रकरणाची चाचपणी करणे.त्‍यासाठी लागणा-या कागदपत्राँची पूर्तता करणे.
अलीकडे शेळीपालन व्यवसायास बरेच महत्व येत असून तो एक स्वतंत्र व्यवसाय झाला आहे हा व्यवसाय करणा-या पशुपालकांची संख्या मोठया प्रमाणावर वाढते आहे. त्याचप्रमाणे इतर व्यावसायिक मंडळी देखील या व्यवसायात पडू पाहत आहेत शासनही या व्यवसायाला आर्थिक सहाय देत आहे त्याचप्रमाणे शेळीच्या मांसाची मागणीही दिवसेंदिवस वाढतच आहे काही ठराविक जातीच्या शेळया दर दिवशी सरासरी दोन ते अडीच लिटर दूध देतात त्यामुळे हा व्यवसाय अधिकच लोकप्रिय होत आहे.
शेळी पालनाचे फायदे-
1) अल्प गुंतवणुकीने हा व्यवसाय केल्या जाऊ शकतो
2) शेळया या शेतक-यांसाठी बचत बॅकेचे कार्य करीत असतात आवश्यकता पडल्यास त्वरीत काही शेळया विकून पैसा उभा केला जाऊ शकतो.
3) शेतक-यास दूध विकत घेणे शक्य नसल्यामुळे शेळीचा दुधाचा वापर करणारे ग्रामीण लोक मोठया प्रमाणावर आढळतात.
4) शेळया काटक असून विपरीत हवामानाशी जुळवून घेतात.
5) शेळया निकृष्ट प्रतिच्या चा-याचे मांसात किंवा दुधात रूपांतर करतात.
6) शेळयांचे दोन पिढीतील अंतर कमी असून लवकर उत्पादन मिळते.
7) त्यांना जागा कमी लागते यामुळे निवा-याकरिता खर्च कमी होतो.
8) काही जातीच्या शेळयापासून लोकर (मोहोर) मिळते.
9) शेळयांचे खत उत्तम असते.
10) आपल्या देशात गोमांस कुणी खात नाही म्हणून शेळीच्या मांसाला जास्त मागणी आहे.
11) शेळयांच्या शिंगापासून डिंकयुक्त पदार्थ बनवितात.
12) शाकाहारी अन्नात कमी असणारे अमिनो आम्ल उदा लायसिन, मिथिओन व ट्रिप्टोफॅन शेळीच्या मासांत अधिक असते.
13) शेळीपालन व्यवसाय हा महिलांमार्फत सहज केल्या जावू शकतो.
भारतीय अर्थव्यवस्थेत शेळयांचे महत्व जगात एकंदर 620 दशलक्ष शेळया असून त्यापैकी 123 दशलक्ष शेळया भारतात आहे शेळयांच्या संख्येने जरी भारत प्रथम क्रमांकावर असला तरी त्यापासून मिळणारे उत्पन्न फार कमी आहे देशातील दुध, मांस, व कातडीच्या एकंदर उत्पादनापैकी 3 टक्के दुध 45 ते 50 टक्के मांस तर 45 टक्के कातडी शेळयापासून मिळते. भारतात शेळयांचे 50 टक्के मांस तर 45 टक्के कातडी शेळयापासून मिळते भारतात शेळयांचे सरासरी वार्षिक दूध उत्पादन फक्त 58 लिटर आहे व शेळीच्या दुधाला मागणी नाही खरं तर शेळीचा विकास दुध उत्पादनाकरीता झालाच नाही आपल्या कडील निवडक जातीच्या शेळया एका वेतात 200 ते 250 लिटर दुध देतात तर विदेशी जातीच्या शेळया 1200 ते 1700 लिटर दुध देतात.
आपल्या देशात शेळयापासून वर्षाकाठी 2.2 दशलक्ष टन मांस मिळते तर पश्मिना जातीच्या शेळीपासून लोकरही मिळते.
शेळयांच्या जाती
भारतात शेळयांच्या प्रमुख 25 जाती आढळतात आपल्याकडील जमनापरी बिंटल सुर्ती, मारवाडी, बारबेरी इत्यादी जाती दुध उत्पादनाकरिता तर बिटल, उस्मानाबादी, सुर्ती, अजमेरी, इत्यादी जाती लोकर उत्पादनाकरीता बिटल,उस्मानाबादी,सिरोही सुर्ती अजमेरी इत्यादी जाती लोकर किंवा मोहेर उत्पादनाकरीता वापरतात. या सर्व जातींची वाढ मंद गतीने होते साधारणपणे एका वर्षात सरासरी वजन 20 किलो होते या उलट विदेषी जातीच्या शेळया उदा सानेन, टोने, बर्ग, अल्पाईन, एम्लोन्यूबियन, अंगोरा इत्यादी सुधारित जाती फारच झपाटयाने वाढतात अफ्रिकेतील बोयर जातीच्या शेळया वजनदार जाती फारच झपाटयाने वाढतात. अफ्रिकेतील बोयर जातीच्या शेळया वजनदार असून नराचे सरासरी वजन 100 ते 125 किलो तर मादीचे सरासरी वजन 90 ते 100 किलो असते आपल्याकडे शुध्द जातीच्या शेंळया वापरावयाच्या असल्यास उस्मानाबादी किंवा संगमनेरी शेळया वापराव्या संकरित शेळया वापरल्यास अधिक उत्पन्न मिळते.वरील ठळक अक्षरात दिलेल्‍या शेळयांच्‍या जाती तूम्‍ही मटण / दूधासाठी पाळू शकता.
अर्धबंदीस्त शेळीपालनाची आवश्यकता -
शेळयांची चरण्याची पध्दत इतर गुरांप्रमाणे म्हणजे गाय, म्हैस मेंढी, यापेक्षा वेगळी असून त्या प्रत्येक झाडाचे झुडपे खातात जर आपण शेळयांचे अर्धबंदिस्त संगोपन केले तर त्यांची झपाटयाने वाढ होते.
अर्धबंदीस्त शेळीचे व्यवस्थापन -
1) शेळीकरीता कमी गुंतवणुकीचे वाडे (गाळे) असावे हेवाडे बास, बल्ली, तट्टे तु-हाटया
प-हाटया यांच्या सहायाने करावे
2) प्रती शेळी किमान 100 ग्रॅम खुराक दयावा प्रत्येक शेळीला किमान दिड ते 2 किलो हिरवा चारा दयावा झाडांची पाने दिल्यास उत्तम विविध झाडांची पाने उदा चिंच, बाभुळ, बोर, पिंपळ, सुबाभूळ, कंदब, निंब इत्यादी
3) शेळयांना मोकळया जागेत ठेवावे
4) कळपात 20 ते 25 शेळयामागे एक नर असावा
5) गाभळ शेळयाची व दुभत्या शेळयाची विशेष काळजी ध्यावी
6) करडांची जोपासना काळजीपुर्वक करावी
7) दिवसभरात किमान एक वेळा तरी शेळयांचे निरीक्षण करावे आजारी शेळयांना अगक करून पशुवैदयकांच्या सल्यानुसार औषधे दयावीत
8) शेळयाबांबत नोंदी ठेवाव्या व्याल्याची तारीख, शेळया फळल्याची तारीख मृत्यूच्या नोंदी इत्यादी

Address

At Post :/kolhewadi, Tal:/sangamner, Dis;-Anagar
Sangamnor
422605

Telephone

9561321200

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when कुषीधन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share